नमस्कार मित्रांनो देशभरातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीचा मजबूत आधार ठरणारी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी मोठी संधी घेऊन आली आहे.या योजनेत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये मिळतात, मात्र अजूनही अनेक शेतकरी योजनेच्या कक्षेबाहेर आहेत.देशातील लाखो शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे, पण काही जण विविध तांत्रिक कारणांमुळे अद्याप या सुविधेपासून दूर राहिले आहेत. अशा शेतकऱ्यांसाठी सरकार 15 एप्रिल 2025 पासून नव्या नोंदणी प्रक्रियेला सुरुवात करणार आहे.
हे सुद्धा बघा : तुमच्या एसटी बसची लोकेशन बघा आता तुमच्या मोबाईलवर दोन मिनिटात अशाप्रकारे करा चेक
योजनेत नोंदणी झाल्यानंतर मागील काही हफ्त्यांचे पैसेही मिळण्याची शक्यता आहे.त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी ही संधी गमावू नये आणि त्वरित अर्ज करावा,असे सरकारकडून आवाहन करण्यात आले आहे जर तुम्ही अद्याप या योजनेत नाव नोंदवले नसेल, तर खालील अटी पूर्ण करणं आवश्यक आहेशेतीयोग्य जमीन असणे गरजेचे ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण असणे आवश्यकपीएम किसान पोर्टलवर अधिकृत नोंदणी करणे बंधनकारकवरील तीन अटी पूर्ण करणारे शेतकरी या योजनेचा लाभ सहज घेऊ शकतात.जर तुम्हाला या योजनेत अर्ज करायचा असेल तर तुम्हाला सर्वप्रथम पीएम किसानच्या pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
हे सुद्धा बघा : तुमच्या एसटी बसची लोकेशन बघा आता तुमच्या मोबाईलवर दोन मिनिटात अशाप्रकारे करा चेक
नंतर ‘नवीन शेतकरी नोंदणी’वर क्लिक करा. आणि आधार क्रमांक टाका आणि OTP द्वारे पडताळणी करा.संपूर्ण आवश्यक माहिती भरून अर्ज सबमिट करा. असे केल्याने तुमची अर्जप्रक्रिया पूर्ण होईल.दरम्यान, पंतप्रधान किसान योजना ही शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरत आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी वेळ न घालवता त्वरित नोंदणी करावी, जेणेकरून त्यांना आर्थिक मदतीचा लाभ मिळू शकेल. सरकारच्या या योजनेमुळे शेती व्यवसाय अधिक सक्षम आणि फायदेशीर होण्यास मदत होईल.