कांदाचाळ, अनुदानासाठी अर्ज प्रक्रिया आणि पात्रता जाणून घ्या!

onion storage subsidy : कांदा पिकाखालील क्षेत्र व उत्पादनात भारत जगात दुस-या क्रमांकावर असून देशांतर्गत गरजा भागवून भारतातून कांद्याची मोठा प्रमाणावर निर्यात करुन बहुमोल असे परकीय चलन देखील प्राप्त होते. महाराष्ट्रात कांदा हे एक महत्वाचे पीकआहे. महाराष्ट्रात कांदा पिकाची लागवड हि मुख्यत्वे नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर, बुलढाणा, जळगाव , उस्मानाबाद व धुळे या जिल्ह्यात केली जाते.

हेही वाचा । शेतकऱ्यांना पाईपलाईनसाठी १००% अनुदान मिळेल, पाईपलाईनसाठी अर्ज प्रक्रिया अनुदान पहा

कांदा हा नाशिवंत असल्याने कांदा दिर्घकाळ टिकविणे शक्य होत नाही यासाठी कांदा चाळीच्या माध्यमातून साठवणूक करणे आवश्यक असते. हि कांदा चाळ बनविण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान उपलब्ध करुन देण्यासाठी kanda chal anudan yojana योजना राबविली जाते.

 

शेतकऱ्यांना या योजनेत 5,10,15,20,25 व 50 मेट्रिक टन क्षमतेच्या कांदाचाळी साठी अनुदानाचा लाभ दिला जातो. यासाठी शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर कांदा पिकाची नोंद असणे बंधनकारक आहे. वैयक्तिक शेतकऱ्यांना 100 मेट्रिक टना पर्यंत तर सहकारी संस्थांसाठी 500 मॅटिक टनापर्यंत चाल बांधण्याची तरतूद या योजनेत आहे.

हे पण वाचा | सरसगट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा जमा चेक करा याद्या

कांदा चाळी साठी अर्ज Maha Dbt Portal वर ऑनलाईन पध्धतीने करावा लागतो.

योजनेचा लाभ घेण्यासाठी काही आवश्यक अटी व कागदपत्रांची पूर्तता आवश्यक आहे. अर्जदार शेतकऱ्याच्या नावावर स्वतःची जमीन असणे गरजेचे आहे आणि त्याच्या सातबारा उताऱ्यावर कांद्याची शेती केलेली नोंद असणे आवश्यक आहे. याशिवाय, शेतकऱ्याकडे त्या हंगामात कांद्याचे पीक असणे अनिवार्य आहे. ही योजना वैयक्तिक कांदा उत्पादक शेतकरी, शेतकऱ्यांचे गट, महिला गट, स्वयंसहायता गट, उत्पादक संघटना, सहकारी संस्था व सहकारी पणन संघ या सर्वाना खुली आहे.

 

कांदाचाळ किंवा लसूण साठवणूक गृहासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. इच्छुक शेतकरी किंवा गटांना महा-डीबीटी (MahaDBT) पोर्टलवर जाऊन फलोत्पादन विभागात काढणीपश्चात व्यवस्थापन कार्यक्रमाखाली कांदाचाळ किंवा लसूण साठवणूक गृह या घटकासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागतो. अर्ज करताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे जसे की सातबारा, आधारकार्ड, बँक पासबुक, पीक नोंदणीपत्रक इत्यादी स्कॅन करून अपलोड करावी लागतात. यामुळे अर्जाची प्रक्रिया पारदर्शक आणि जलद होते.

हे पण वाचा |शौचालय योजना ऑनलाइन नोंदणी, शौचालय योजनेसाठी नवीन नोंदणी सुरू

शास्त्रशुद्ध कांदाचाळी उभारणीमुळे कांद्याची टिकाऊपणा वाढते, खराब होण्याचे प्रमाण कमी होते आणि त्याच्या गुणवत्ता व विक्रीक्षमतेत सुधारणा होते. यामुळे शेतकऱ्यांना बाजारात अधिक चांगले दर मिळतात आणि त्यांचा उत्पन्न वाढतो. याशिवाय, लसूण साठवणूक गृहांमुळेही लसूणाचे नुकसान टाळता येते. या योजना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना उत्पादनाचा दर्जा वाढवून आर्थिक स्थैर्य मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत करतील.

Leave a Comment