नमस्कार मित्रांनो भारतातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार विविध योजना आणत असते. यापैकी प्रधानमंत्री किसान मानधन योजना (PM-KMY) ही अत्यंत महत्त्वाची योजना आहे. ही योजना शेतकऱ्यांना वयाच्या 60 वर्षांनंतर दरमहा 3,000 रु पेन्शन मिळवून देते.शेतकऱ्यांसाठी ही योजना का महत्त्वाची आहे? कोण पात्र आहेत ? अर्ज कसा करायचा? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.ही एक पेन्शन योजना आहे, ज्याअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वयाच्या 60 वर्षांनंतर दरमहा 3,000 रुपये मिळतात.
शेतकऱ्यांनी आपल्या वयानुसार 55 ते 200 रुपये दरमहा भरावे लागतात, आणि सरकारही त्याच रकमेत योगदान देते.वयाच्या 60 वर्षांनंतर पेन्शन सुरू होते, या माध्यमातून दरमहा 3,000 रुपये मिळतात. शेतकरी ज्या पद्धतीने पैसे भरतात. त्याच प्रमाणात केंद्र सरकारही पैसे भरते. लाभार्थीच्या मृत्यूनंतर कुटुंबासाठी मदत – लाभार्थीचा मृत्यू झाल्यास, त्याच्या पत्नीला दरमहा 1,500 रुपये मिळतात. इच्छुक शेतकरीच या योजनेत सहभागी होऊ शकतात. अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.
कसा करायचा अर्ज?
नोंदणी मोफत आहे आणि CSC (Common Service Center) किंवा राज्य नोडल ऑफिसर यांच्यामार्फत करता येते.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
7/12 उतारा किंवा जमीन मालकीचा पुरावा
बँक खाते तपशील
वयोमर्यादेनुसार 55 ते 200 रु प्रीमियम भरावा लागतो.