मोठी बातमी! FASTag चे नवीन नियम झाले लागू; प्रवास करण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा

नमस्कार मित्रांनो व्यवहार सुलभ करण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने एक नवे पाऊल उचलले आहे. त्यानुसार १७ फेब्रुवारी २०२५ पासून NPCI नवीन FASTag बॅलन्स व्हॅलिडेशन नियम लागू होईल.हे बदल टोल व्यवहार सुलभ करण्यासाठी आणि फसवणूक टाळण्यासाठी तयार करण्यात आल्याचे सांगितले जातेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

हे सुद्धा बघा : मोठी खुशखबर.! सोने चांदी झाले इतक्या रुपयांनी स्वस्त पहा लगेच ताजे नवीन दर

१ एप्रिलपासून राज्यातील टोल नाक्यांवर टोल वसुली केवळ फास्टॅगद्वारे केली जाईल, असे यावेळी ठरले. हा बदल सुलभ करण्यासाठी सार्वजनिक-खाजगी भागीदारी धोरण २०१४ मध्ये सुधारणांनाही मान्यता देण्यात आली. FASTag ही राष्ट्रीय महामार्गांसाठी भारतातील इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन चिप आहे. या निर्णयामुळे टोल वसुलीत कार्यक्षमता आणि पारदर्शकता येईल आणि टोल प्लाझावरील वाहनांची गर्दी कमी होईल अशी अपेक्षा आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ आणि इंधन वाचेल, असे सरकारी निवेदनात म्हटले आहे. तसेच फास्टॅग नसलेल्या किंवा योग्य टॅगशिवाय समर्पित लेनमध्ये प्रवेश करणाऱ्या वाहनांना दुप्पट टोल शुल्क भरावे लागेल, असेही त्यात म्हटले आहे.

हे सुद्धा बघा : मोठी खुशखबर.! सोने चांदी झाले इतक्या रुपयांनी स्वस्त पहा लगेच ताजे नवीन दर

टोल प्लाझावर पोहोचण्यापूर्वी तुमच्या FASTag मध्ये पुरेसा शिल्लक असल्याची खात्री करावी. ब्लॅकलिस्टिंग टाळण्यासाठी तुमचे फास्टॅग केवायसी तपशील नियमितपणे अपडेट करणे अनिवार्य झाले आहे. लांबचा प्रवास सुरू करण्यापूर्वी प्रत्येक चालकाने त्याच्या FASTag ची स्थिती पडताळून पाहणे आवश्यक आहे. नवीन FASTag नियमांचा उद्देश नागरिकांसाठी टोल व्यवहार अधिक सुलभ आणि अधिक विश्वासार्ह बनवणे आहे

Leave a Comment