नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून सतत नवनव्या योजना राबवल्या जात आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठ्या प्रमाणावर निर्णय घेतले जात असून,या निर्णयांमुळे शेती आणि शेतकऱ्यांना प्रगतीचा नवा मार्ग मिळत आहे.राज्य सरकारकडून शेतीसाठी विविध अनुदाने दिली जातात, त्यात ‘सिंचन विहीर योजना’ हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. विशेष म्हणजे आता या योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे,ज्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
हे सुद्धा बघा : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर.! सोने होणार आता स्वस्त सरकार आणणार ही नवीन योजना
राज्यातील कोरडवाहू जमिनींना बागायतीमध्ये बदलण्यासाठी व पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MNREGA) अंतर्गत शेतकऱ्यांना विहीर बांधण्यासाठी चार ते पाच लाख रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाते. या योजनेतून अल्पभूधारक शेतकऱ्यांना सिंचनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.या योजनेत नुकताच एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. शासनाने 2025 च्या नवीन निर्णयानुसार भोगवटादार वर्ग २ (Occupant Class 2) जमीनधारक शेतकऱ्यांनाही या योजनेत समाविष्ट केले आहे. यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे वर्ग २ प्रकारातील जमीन आहे, त्यांनाही विहिरीसाठी असणाऱ्या अनुदानाचा लाभ घेता येणार आहे.सर्व आवश्यक कागदपत्रे: सातबारा उतारा, जमीन धारकाचा दाखला, ओळखपत्र (आधार कार्ड), पाणी स्रोताचा दाखला, तसेच भोगवटादार वर्ग २ असल्याचा पुरावा देखील तुम्हाला जमा करावा लागेल.ऑनलाइन अर्ज: या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी सरकारच्या अधिकृत पोर्टलवर देखील अर्ज सादर करता येईल.तपासणी प्रक्रिया: त्यानंतर अर्जाची पडताळणी झाल्यावरच यासाठीचा लाभ मंजूर केला जाईल.
हे सुद्धा बघा : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर.! सोने होणार आता स्वस्त सरकार आणणार ही नवीन योजना
शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या समस्येवर मात करण्यासाठी हा महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. भोगवटादार वर्ग २ शेतकऱ्यांनाही पात्र करण्यात आल्यामुळे मोठ्या संख्येने शेतकरी याचा लाभ घेऊ शकतील. कोरडवाहू शेती बागायती करण्यासाठी हा निर्णय शेतकऱ्यांसाठी गेमचेंजर ठरणार आहे.राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सातत्याने योजना राबवल्या जातात. सिंचन विहीर योजना ही त्यातील एक महत्त्वाची योजना असून, यामध्ये झालेला हा बदल शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यात मदत करणार आहे.