नमस्कार मित्रांनो नागरिकांच्या हितासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. यात महिला, शेतकरी आणि विद्यार्थ्यांसाठी खास योजना राबवल्या आहे.अनेक बँका, पोस्ट ऑफिसदेखील अनेक योजना राबवत असतात. या योजनांमध्ये नागरिकांना आर्थिक मदत मिळते.बँक ऑफ बडोदाने विद्यार्थ्यांसाठी पीएम विद्यालक्ष्मी योजना राबवली आहे.या योजनेत विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे.
या योजनेत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. त्यांच्या फीसाठी आर्थिक मदत केली जाते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही हमीशिवाय तुम्हाला कर्ज मिळणार आहे. बँक ऑफ इंडियाने हा महत्त्वाचा उपक्रम सुरु केला आहे.अनेकदा आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी अडचणी येतात. त्यामुळे शिक्षण घेता येत नाही. हेच विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी ही योजना सुरु केली आहे. या योजनेसाठी अर्जदार बँक ऑफ इंडियाच्या वेबसाइटवर जाऊनदेखील अर्ज करु शकतात.
शैक्षणिक कर्जासाठी तुम्हाला कर्ज मिळणार आहे. पीएम विद्यालक्ष्मी या योजनेत काहीही तारण न ठेवता हमीशिवाय कर्ज दिले जाणार आहे. ही प्रक्रिया संपूर्णपणे डिजिटल असणार आहे.यामध्ये सर्वसाधारणपणे १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज कोणत्याही हमीशिवाय दिले जातात. या कर्जाची परतफेड तुम्ही शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १ वर्षाच्या कालावधीनंतर करु शकतात.या योजनेसाठी तु्म्ही विद्यालक्ष्मी पोर्टलवर जा. त्यानंतर लॉग इन करा आणि शिक्षण कर्जावर क्लिक करा. यानंतर तुम्ही विविध बँकांच्या कर्जाचे व्याज बघून अर्ज करा.