नमस्कार मित्रांनो सर्व नागरिकांसाठी महत्त्वाचं कागद पत्र म्हणून ओळलखं जातं. तसेच नागरिकांना कमीत कमी रुपयांमध्ये धान्य मिळावे, जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात, तसेच सरकारी उपाययोजनांमध्ये सवलत मिळावी यासाठी रेशन कार्डचे वाटप करण्यात येते.
याच रेशन कार्ड लाभार्थी कुटुंबियांसाठी सरकार तर्फे खुशखबर देण्यात आली आहे.अन्न धान्यांचा गैरमार्गाला चाप बसविण्यासाठी तसेच रेशन कार्ड लाभार्थीना जलद माहिती मिळण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने (Food and Civil Supplies Department) मोबाइलचा प्रभावीपणे वापर सुरू केला आहे. सार्वजनिक धान्य वितरण प्रणालीच्या लाभार्थीना रेशन दुकानात (Ration grain shop) धान्य आले आहे का, याची माहिती त्यांना मोबाइलवर संदेश (Ration Card Message) द्वारे कळविण्यात येणार आहेसार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
पालघर जिल्ह्यात एकूण ४ लाख ३२ हजार ४१ लाभार्थी आहेत. त्यातील ९७,९५९ हे अंत्योदयाचे लाभार्थी आहेत. तर उरलेले ३ लाख लाभार्थी हे प्राधान्य कुटुंबातील आहे. आता नवीन नियमांनुसार तुम्हाला धान्य रेशन दुकानावर आल्यावर मोबाईलवर मेसेज येणार आहे. यासाठी तुम्हाला रेशन दुकानावर जाऊन आधार कार्ड आणि मोबाईल नंबरची नोंद करावी लागणार आहे.धान्य आले ते कळणार कसे?शासनाच्या एसएमएस गेटवे सिस्टमद्वारे लाभार्थीना मोबाइलवर मेसेज पाठवला जाणार आहे.ई-पॉज मशीनवर लाभार्थीचा अंगठा घेतल्यानंतरच धान्य वितरण होते.
त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीने धान्य उचलण्याचा प्रश्नच येत नाही, असे अधिकाऱ्याने स्पष्ट केले.नंबर अपडेटला पैसे लागतात का?मोबाइल सिडिंग प्रक्रिया ही ई-पॉज मशीन, तसेच आरसीएमएस साइटद्वारे राबवली जाते. यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.