नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकताच दहावीचा निकाल जाहीर केला. राज्याचा एकूण ९४ टक्के निकाल लागला असून, यंदाही मुलींनी बाजी मारली . राज्य सरकारकडून कामगारांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक प्रोत्साहन म्हणून एक महत्त्वाची योजना राबवली जाते.दहावी – बारावी शैक्षणिक आर्थिक सहाय्य योजना’ असे योजनेचे नाव आहे .योजनेद्वारे दहावी आणि बारावीत पास झालेल्या विद्यार्थ्यांना सरकारकडून १०,००० रुपये दिले जातात. जर, आपल्या पाल्याला दहावीत ५० टक्के मिळाले असतील, तर त्यांनाच या सरकारी योजनेचा लाभ मिळेल.
हे सुद्धा बघा : लाडक्या बहिणींना मिळणार 40 हजार रुपये पर्यंत कर्ज येथे बघा अर्ज प्रकिया
राज्य सरकार महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे नोंदणीकृत कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवते. यापैकी एक म्हणजे, ‘दहावी ते बारावी शैक्षणिक आर्थिक सहाय्य योजना’.या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांच्या जास्तीत जास्त २ मुलांना दहावी किंवा बारावीत ५० टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळाल्यास शिष्यवृत्ती दिली जाईल.योजनेचे वैशिष्ट्येदहावी किंवा बारावीत ५० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळाल्यास विद्यार्थ्यांना १०,००० रूपयांची शिष्यवृत्ती दिली जाते.
हे सुद्धा बघा : लाडक्या बहिणींना मिळणार 40 हजार रुपये पर्यंत कर्ज येथे बघा अर्ज प्रकिया
शिष्यवृत्ती फक्त बांधकाम कामगारांच्या जास्तीत जास्त २ मुलांना दिली जाते.या योजनेचा उद्देश कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्याचे प्रयत्न.
शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्रता
विद्यार्थ्याचे पालक महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे नोंदणीकृत सदस्य असावेत.विद्यार्थी आणि त्याचे कुटुंब महाराष्ट्राचे नागरिक असावे.अर्जदाराला दहावी किंवा बारावीत किमान ५० टक्के गुण असणे आवश्यक आहे.