मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा.! आता शेतकऱ्यांना वर्षाला मिळणार 15000 रुपये

नमस्कार मित्रांनो : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) जेव्हा किसान सन्मान योजना सुरू केली तेव्हा त्यावर विरोधकांकडून टीका झाली. पण आज शेतकऱ्यांच्या अडचणीत तो पैसे कामात येत आहे. योजनेचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. परिणामी, राज्य सरकार देखील आपले पैसे यात देत असून त्यात वाढ देखील केली जाईल.त्यामुळे वर्षाला 15 हजार रुपये हे शेतकऱ्यांना मिळणार असल्याची मोठी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा (PM Kisan Samman Nidhi) 19वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते (ऑनलाइन) वितरण होत आहे.

हे सुद्धा बघा : लाडक्या बहिणींसाठी खुशखबर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला हा निर्णय

नागपूरच्या (Nagpur) वनामती सभागृहात हा कार्यक्रम पार पडत असून या ठिकाणी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोलताना ही घोषणा केली आहे. मुख्यमंत्री असताना कृषी क्षेत्रात अनेक काम केलेत. त्यात जलयुक्त शिवार, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आणली. आता त्याचा दुसरा टप्पा सुरू होतोय, पूर्ण विदर्भ, मराठवाडा यात समाविष्ट होईल. यासाठी 6 हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. तर दुसरीकडे कृषी प्रक्रिया उद्योग, कॅश क्रॉपसाठी मदत केली जाणार आहे. किंबहुना चांगलं काम करणाऱ्यांचा हप्ता थांबवू नका अशी सूचना अधिकाऱ्यांना दिल्याचेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. ऍग्रीस्टॉकमुळे दलाल विरहित शेतीपर्यंत पोहोचण्याचा साधन होत आहे. आतापर्यंत 54 टक्के शेतकरी यात शामिल झाले असून पुढील काळात 100 टक्के शेतकरी यात आणायचे आहे. असेही मुख्यमंत्री म्हणाले.शेतकरी उत्पादन खर्च कमी करून शेतकऱ्यांना बाजाराशी जोडण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.

हे सुद्धा बघा : लाडक्या बहिणींसाठी खुशखबर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला हा निर्णय

गावातील सोसायटी डिजिटल केले जात आहे. त्यांना आणखी मजबूत केलं जातं आहे. शेतकऱ्यांचे वीज बिल माफ केलं असून पुढील पाच वर्ष वीज बिल येणार नाही. शिवाय कृषी सोलर पंप योजना जेव्हा सुरू झाली तेव्हा पासून मागल्या वर्षी पर्यंत 2 लाख कनेक्शन, तर गेल्या 1 वर्षात दोन लाख कनेक्शन दिले गेलेत. त्याचा पूर्ण देखरेख इन्शुरन्स आमच्याकडे आहे. वैनगंगा, नळगंगा हा नदी जोड प्रकल्प सुरू होत असून यातून 7 जिल्ह्यातील 10 लाख एकर जमीन ओलिताखाली येणार आहे. केंद्र आणि राज्यसरकार शेतकरी समर्पित असल्याची भावना ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावेळी बोलून दाखवली.

Leave a Comment