नमस्कार मित्रांनो देशभरातील अनेक बँका एटीएम ऑपरेशन्ससाठी फ्रँचायझी प्रणाली (Franchise System) वापरतात. ज्यामुळे उद्योजकांना स्थिर उत्पन्न मिळवण्याची संधी मिळते.स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) देखील अशा संकल्पनेचा अवलंब करत आहे.एसबीआय थेट एटीएम फ्रँचायझी देत नाही. परंतु टाटा इंडिकॅश, इंडिया वन आणि मुथूट एटीएम यांसारख्या अधिकृत कंपन्यांमार्फत ही सेवा दिली जाते. इच्छुक व्यावसायिकांना एटीएम बसवण्याची संधी मिळते.त्यातून प्रत्येक व्यवहारावर ठराविक कमिशन दिले जाते.
रोख रकमेच्या व्यवहारावर 8 रुपये तर रोखरहित व्यवहारावर 2 रुपये कमिशन मिळते. योग्य ठिकाणी एटीएम बसवले आणि दिवसाला 250 ते 300 व्यवहार झाले, तर दरमहा 90 हजार रुपयांपर्यंत कमाई होते.व्यवसायासाठी 50 ते 80 चौरस फूट जागा असणे आवश्यक आहे.ती गर्दीच्या भागात, बाजारपेठेत, बस स्थानक, रेल्वे स्टेशन किंवा मुख्य रस्त्याजवळ असायला हवी. तसेच 24 तास अखंड वीजपुरवठ्यासाठी 1 किलोवॅट वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे. यासह सीसीटीव्ही, इंटरनेट कनेक्शन आणि सुरक्षेची योग्य व्यवस्था करणे बंधनकारक आहे.फ्रँचायझीसाठी काही महत्त्वाची कागदपत्रे लागतात. आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खाते, जीएसटी नोंदणी आणि जागेच्या मालकीचा पुरावा किंवा भाडे करार अनिवार्य आहे.
तसेच सुरुवातीला 2 ते 3 लाख रुपयांची सुरक्षा ठेव भरावी लागते. एटीएम मशीन बसवण्याचा आणि सुरळीत चालवण्याचा खर्च साधारण 5 ते 7 लाख रुपयांच्या दरम्यान असतो.फ्रँचायझी मुख्य जबाबदारी म्हणजे एटीएममध्ये वेळोवेळी रोख रक्कम उपलब्ध करून देणे. तसेच मशीनच्या देखभालीची जबाबदारी घेणे. तसेच, व्यवहार सुरळीत चालण्यासाठी इंटरनेट आणि वीजपुरवठा सतत सुरू ठेवणे गरजेचे आहे. यासह कोणत्याही तांत्रिक समस्येवर वेळीच उपाययोजना करण्याची जबाबदारी फ्रँचायझी धारकाची असते.