नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सोलापूर जिल्ह्यातील ११ लाख नऊ हजार ४७८ महिलांनी अर्ज केले होते. त्यांना पहिले तीन हप्ते मिळाले, पण आता निकषांच्या तंतोतंत पडताळणीत अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींचा लाभ कायमचा बंद करण्यात येत आहे.त्यात सोलापूर जिल्ह्यातील चारचाकी स्वत:च्या नावावर असलेल्या १२ हजार महिला आहेत. याशिवाय संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे २८ हजार महिला लाडक्या बहिणींचाही लाभ घेत होत्या.
हे सुद्धा बघा : PhonePe युजर्ससाठी आनंदाची बातमी, आता बँकेत खाते नसले तरीही पेमेंट करता येणार
विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असलेल्या महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. त्यानुसार राज्यातून अडीच कोटी तर सोलापूर जिल्ह्यातून ११ लाखांहून अधिक महिलांनी अर्ज भरले. अनेक महिलांनी अपात्र असतानाही जेवढा मिळतो, तेवढा लाभ घेण्याच्या उद्देशाने अर्ज केले. त्यात परराज्यातील महिला देखील होत्या. विधानसभेच्या निकालानंतर राज्य स्तरावर अशा तक्रारी प्राप्त झाल्यावर निकषांच्या अनुषंगाने पडताळणी हाती घेण्यात आली.
हे सुद्धा बघा : PhonePe युजर्ससाठी आनंदाची बातमी, आता बँकेत खाते नसले तरीही पेमेंट करता येणार
त्यात राज्यभरातील १५ लाखांहून अधिक महिला अपात्र ठरल्या.तर शेतकरी सन्मान निधी योजनांचा लाभ घेणाऱ्या १९ लाख महिला लाडक्या बहिणी योजनेत असल्याचे निदर्शनास आले. त्यांना सन्मान निधीच्या दोन्ही योजनांमधून दरवर्षी १२ हजार रुपये मिळतात म्हणून उर्वरित सहा हजार रुपये त्यांना प्रत्येक महिन्याला ५०० प्रमाणे लाभ देण्याचा निर्णय झाला. आता आयकर भरणाऱ्या महिलांची पडताळणी राज्यस्तरावरून सुरू असून त्यातील अडीच लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या लाडक्या बहिणींचा लाभ देखील आगामी काळात बंद होणार आहे.