नमस्कार मित्रांनो राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून सुरु होणार आहे. ३ मार्च ते २१ मार्च या कालावधीत हे अधिवेशन पार पडणार आहे. तसेच १० मार्च रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करणार आहेत.३ मार्च ते २१ मार्च दरम्यानच्या कालावधीत अधिवेशनाचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. राज्यात महायुती सरकार सत्तेत आल्यानंतरचा हा पहिला पूर्ण अर्थसंकल्प असल्याने कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात येईल,
हे सुद्धा बघा : शेतकऱ्यांनो शेतात घर बांधत असाल तर ही माहिती नक्की वाचा अन्यथा होणार मोठी कारवाई
अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. दरम्यान, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपालांचे अभिभाषण होईल. त्यानंतर राज्यपालांच्या अभिभाषणावर दोन दिवस चर्चा होणार आहे. तसेच त्यानंतर पुरवणी मागण्या मांडल्या जाणार आहेत. तर अधिवेशनात दोन दिवस सर्वसाधारण चर्चेसाठी ठेवण्यात आले आहेत. तसेच विभागनिहाय मागण्यांवरील चर्चेसाठी पाच दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधिमंडळाची संयुक्त बैठक होईल. या बैठकीत राज्यपाल अभिभाषण करतील. या अभिभाषणावर दोन दिवस चर्चा होईल. तर ७ मार्च रोजी पुरवणी विनियोजन मांडण्यात येईल. तर १० मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार सादर करतील.
हे सुद्धा बघा : शेतकऱ्यांनो शेतात घर बांधत असाल तर ही माहिती नक्की वाचा अन्यथा होणार मोठी कारवाई